किसान भागीदारी प्राथमिकता हमारी किसान मेळावा

                   आझादी का अमृत महोत्सव “किसान भागीदारी, प्राथमिकता हमारी” अभियाना अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा, वर्धा तसेच कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमानाने सेवाग्राम येथील चरखा सभागृह येथे दि. २६ ते २७ एप्रिल २०२२ दरम्यान दोन दिवसीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन २६ एप्रिल २०२२ रोजी मा. श्रीमती प्रेरणा देशभ्रतार(भा.प्र.से) , जिल्हाधिकारी , वर्धा यांच्या हस्ते झाले . याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. अनिल इंगळे , डॉ. श्री. जिवन कतोरे, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, वर्धा , डॉ. विदया मानकर, प्रकल्प संचालक, आत्मा, वर्धा  यांची उपस्थिती होती.

                      उद्घाटनपर कार्यक्रमा दरम्यान जिल्हाधिकारी मा. श्रीमती प्रेरणा देशभ्रतार तसेच व्यासपीठावर उपस्थितीत सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले . शेतकरी मेळाव्याचे औचित्यसाधून कृषि कार्यालयाचे, बियाणे, खत, शेतीविषयक विविध साहित्याची माहिती देणारे २० स्टॉल उभारण्यात आले आहेत .  यासोबतच  विविध विषयांवर  विषयतज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले असून, शासनाच्या विविध योजनांच्या संदर्भात माहितीसुद्धा देण्यात येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *