कृविके सेलसुरा येथे पोषण वाटिका महाभियान व वृक्ष लागवड कार्यक्रम उत्साहात संपन्न

भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्रमोदी यांनी २०१८ साली पोषण अभियानाची सुरुवात केली, ज्यामध्ये जन्मतः कमी वजन असणारे व कुपोषित बालके, गर्भवतीमहिला, स्तनदामाता यांना आवश्यकते पोषण मिळावे व त्याबद्दलची जागरूकता निर्माण व्हावी या उद्दिष्टाने दरवर्षी प्रमाणे यावर्षीदेखील सर्वत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत असलेल्या कृषि विज्ञान केंद्र येथे इफको यांच्या संयुक्त विद्यमाने काल दि. १७सप्टेंबर रोजी जि.प. अध्यक्षा, मा. सरिताताई गाखरे व उपाध्यक्षा मा. वैशालीताई येरावार यांच्या प्रमुख उपस्थितीत पोषणवाटिका महाभियान व वृक्षलागवड कार्यक्रम उत्स्फुर्तरित्या संपन्न झाला. कार्यक्रमाचीसुरुवात कृषि जगतेचेप्रणेते डॉ. पंजाबराव देशमुख यांचे फोटोपूजन व दीपप्रज्वलनाने झाली.

ग्रामीण महिलांनी कुटुंबासोबतच स्वतःकडे लक्ष देणे आवश्यक आहे . त्याकरिता योग्य पोषण आहार घेणे गरजेचे आहे. परंतु प्रत्येक महिला दररोजच्या आहारामध्ये पोषक अन्न विकत घेऊ शकत नाही म्हणून स्वतःआपल्या शेतीमध्ये पोषणवाटिका तयार करून दररोजची गरज भागवू शकतात. सध्याच्या तांत्रिक युगात प्रत्येकाला फास्टफूड, जंकफूड खाण्याची आवड आहेपरंतु याचाविपरीत परिणाम आपल्या शरीरावर होत आहे. शहरातील किंवा गावातील तरुणमुला-मुलींनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या शेतीमध्ये सेंद्रियखाद्याचे उत्पन्न घेतल्यास योग्य पोषण आहार उपलब्ध होऊ शकतो असे जि. प. अध्यक्षा सरिताताई गाखरे यांनी प्रतिपादन केले.  

पोषणवाटिका लावून कुपोषण दूर करा, महिलांनी व लहानमुलांनी कडधान्य खाण्याकडे कल वाढविला पाहीजे, सध्याच्या परिस्थितीमध्ये स्वतःची क्षमता वाढविणे खूप आवश्यक झालेले आहे. याकरिता तज्ञलोकांची मदत घ्या, असा सल्ला मा. वैशाली येरावार यांनी दिला.

कृषि विज्ञान केंद्र हे वर्धाजिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शेतीच्या माहितीची एकगुरुकिल्ली आहे.शेतकऱ्यांना आवश्यक असलेले प्रशिक्षण तसेच शेतीमध्ये येणाऱ्या अडचणी वर मतकशी करायची यासंबंधी माहिती येथे प्राप्त होवू शकते म्हणून शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण सभागृह बांधकाम करण्याकरिता व इतर उपक्रमांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन प्रमुख अतिथींनी दिले.

भारताला ७५ वर्षे पूर्ण होत असून स्वातंत्र्याचा अमृत मोहोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने बालके व महिला कुपोषण मुक्त व्हावे याकरिता त्यांना पोषणआहार विषयी संपूर्ण ज्ञान तसेच पोषण वाटिका तयार करण्याकरिता मान्यवरांच्या हस्ते १०० वृक्ष व १०० भाजीपालापिकांचे बियाणे वाटप करण्यात आले. कृविके प्रक्षेत्र व शेतकऱ्यांच्या शेतावर अतिथींच्या हस्तेवृक्षारोपण करण्यात आले.  सर्वांनी कृविके उपक्रमाचे तोंडंभरुन कौतुक केलेतसेच सदर कार्यक्रमाकरिता वर्धा जिल्ह्यातील महिला शेतकरी, ग्रामीण युवक-युवती व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष पदकृविकेचे कार्यक्रम समन्वक डॉ. विलास अतकरे यांनी भूषविले. प्रत्येक पुरुषाच्या प्रगती मागे एका स्त्री चा सहभागअसतो मग ती आई, बहीण, पत्नी, मुलगीकोणीही असू शकते. प्रत्येक घरातील महिला जर सुदृढ असेल तर प्रत्येक कुटुंबपर्यायाने संपूर्ण देशसशक्त बनेल. स्त्री जशी संपूर्ण कुटुंबाची काळजी घेते तशीच तिने स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे याकरिता पोषणयुक्त आहार घेणे गरजेचे आहे असे डॉ. अतकरे यांनी अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन केले.  

तांत्रिक सत्रामध्ये गृहविज्ञान विषयतज्ञ डॉ. प्रेरणा धुमाळ यांनी शेतकरी महिलांना पोषणवाटिकेचेमहत्व, त्याची आखणी तर उद्यानविद्या विषयतज्ञ कांचन तायडे यांनी वृक्षलागवडीचे महत्व व फळबाग लागवड तंत्रज्ञान या विषयांवर मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *